गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने मारलेली बाजी गेल्या वर्षभरात कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर होण्यास मदत करणारी आहे.
पुणे- गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने मारलेली बाजी गेल्या वर्षभरात कार्यकर्त्यांत आलेली मरगळ दूर होण्यास मदत करणारी आहे. शहरी भागात भाजपा पहिल्यापासूनच मजबूत आहे. त्याचा प्रभाव लवकर कमी होणे शक्य नव्हते, मात्र ग्रामीण भागात पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत काँग्रेसने चांगली कामगिरी नोंदवली.
हे निकाल म्हणजे, मुख्यमंत्री पटेल यांना प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश, नरेंद्र मोदींनी केलेला भ्रमनिरास, हार्दिक पटेलचे आंदोलन व गुन्हे दाखल यामुळे गुजरातमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याचाच परिणाम निवडणूक निकालांवर झाला आहे. पुरस्कार वापसी, आमिर खान वक्तव्य अशा लोकांची केली जात असलेली बोळवण याला जबाबदार आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मोहन जोशी यांनी सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी मोहनदादा जोशी, शरद रणपिसे, माजी खासदार अशोक मोहळ आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आणि समिरन वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला चव्हाण यांनी दिलखुलास व सडेतोड उत्तरे दिली.