गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंग्यांमुळेच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली, असा दावा कॉँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी रविवारी केला.
नवी दिल्ली- गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंग्यांमुळेच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना झाली, असा दावा कॉँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी रविवारी केला.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्या आरोपपत्रात गुजरात दंग्यांमुळे इंडियन मुजाहिदीनची स्थापना झाल्याचे नमूद केले आहे. तरीही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे जातीयवादी राजकारणापासून मागे हटायला तयार नाहीत, असा टोला अहमद यांनी ट्विटरवरून लगावला आहे.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जातीयवादी राजकारणाची प्रतिक्रिया म्हणून दहशतवादी संघटना निर्माण होत आहेत. त्यामुळे ज्यांना जातीय राजकारणाला प्रतिबंध करायचा असेल, त्यांनी भाजप व आरएसएसवर दबाव वाढवला पाहिजे, असे शकील अहमद यांनी म्हटले आहे.