अमिताभ बच्चन यांनी गाढवांची जाहिरात करणे बंद करावे असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उंचाहार- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचार आता चांगलाच तापला आहे. अखिलेश यादव यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींना चांगलेच लक्ष केले असून त्यांच्यावर तुटून पडण्याचं काम सध्या अखिलेश यादव करत आहेत.
कोणताही राजकीय पक्ष टीका करण्याची संधी सोडत नाहीत. त्यातच, अमिताभ बच्चन यांनी गाढवांची जाहिरात करणे बंद करावे असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऊंचाहार येथील प्रचार सभेला संबोधित करताना अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीच. त्याचबरोबरीने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही वादात खेचले. अमिताभ बच्चन हे गुजरात राज्याच्या पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बिसेडर आहेत.
गुजरात सरकारच्या नव्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन गुजरातमध्ये आढळणा-या गाढवांची जाहिरात करताना दिसत आहेत. त्याचा संबंध जोडत अमिताभ यांनी गुजरातच्या गाढवांचा अमिताभ यांनी प्रचार करू नये असे विधान केले आहे.
अखिलेश यांचे विधान भाजपा नेत्यांच्या जिव्हारी लागले असून भाजपा त्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे. समाजवादी नेते अखिलेश आणि कॉँग्रेसचे राहुल गांधी यांनी सध्या मोदींना लक्ष केले आहे.