राज्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना मदत पॅकेज जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी देताच राज्याचे मुख्य सचिव जे.एस.सहारिया यांनी पत्रकारपरिषद घेऊन पॅकेज जाहीर केले.
मुंबई – राज्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना मदत पॅकेज जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी देताच राज्याचे मुख्य सचिव जे.एस.सहारिया यांनी पत्रकारपरिषद घेऊन पॅकेज जाहीर केले.
आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार वीस लाख हेक्टरपेक्षा अधिक जागेवरील पिकांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आहे. बागयती पिकांसाठी हेक्टरी पंधराहजार रुपये, फळबागांसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल. पीक कर्जावरील २६८ कोटी रुपयांचे व्याज आणि २०० कोटी रुपयापर्यंतचे वीज बील माफ करण्यात आले आहे.
ज्या शेतक-यांनी आत्महत्या केली त्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये देण्यात येतील. गारपीटीमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना दीडलाख रुपयांची मदत केली जाईल. २६० कोटींचा पहिला हप्ता देण्यात तातडीने देण्यात येत असून, सर्व जिल्हाधिका-यांना ही रक्कम तात्काळ शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.