Sunday, July 7, 2024
Google search engine
Homeकोलाज‘गांधीगिरी’ गरजेची

‘गांधीगिरी’ गरजेची

देश सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अशा वेळी देशाला गांधीजींच्या विचारसरणीची खरी गरज आहे. आदर्श समाज हा देशाच्या विकासाचा आधारस्तंभ मानला जातो. कोणत्याही समाजाचा विशिष्ट आदर्शापर्यंतचा प्रवास मूल्यांमार्फत होतो. ती मूल्यं गांधीजींनी आपल्या आचार-विचारांद्वारे देशाला दिली आहेत. हे लक्षात घेऊन या मूल्यांचं पालन करणं प्रत्येकाचं नतिक कर्तव्य आहे.

गांधीजींनी देशाला सत्य, अहिंसा या तत्त्वांची शिकवण फक्त विचारातूनच नाही तर आचारातूनही दिली. सध्या गांधीजी नोटांवरील आणि फोटोमधील प्रतिमे इतपतच आपल्यात उरले आहेत, हे दुर्दैवाने खरं आहे. तत्त्वांचं पालन करणं इतरांना कठीण वाटू नये, यासाठी त्यांनी स्वत: त्या तत्त्वांचा अंगिकार केला. खरं पाहता गांधीजी समजून घेण्याआधी त्यांच्या आचरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. खरं बोलावं ही अत्यंत साधी गोष्ट गांधीजींनी सांगितली. सत्य आचरण कसं असावं, हेही सांगितलं. पण त्या आचरणात आणण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. समाजात एखादी वाईट घटना घडली, एखादी समस्या निर्माण झाली तर या तत्त्वांची आजघडीला किती गरज आहे, याचा अंदाज लावता येतो. जातीय तेढ निर्माण झाल्यानंतर होणा-या दंगली अिहसा या तत्त्वाची सामाजिक गरज जाणवून देतात. देशाच्या राजकारणाची पातळी समाजकेंद्री होण्याऐवजी व्यक्तीकेंद्री होत आहे. भ्रष्टाचाराच्या रोज नव्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे मथळे भरले जातात. तेव्हा समजतं, देश वेगळ्या दिशेने जात आहे. समाजातील प्रबळ वर्ग दुर्बळांवर होणा-या अन्यायाचं कारण बनत आहे. अनेकदा स्वत:च्या मुलभूत हक्कांसाठी व्यक्तीचा संघर्ष दिसतो. गांधीजींची तत्त्वं सध्याच्या युगात कालबाह्य ठरत आहेत, असा एक प्रवाह समोर येताना दिसतो. पण देशाची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता गांधीजींचे विचार या काळासाठीही लागू पडतात हे पटते.

गांधीजींनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण राष्ट्रहितासाठी दिला होता. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून फक्त स्वातंत्र्यप्राप्ती नव्हे तर मानवता आणि विश्वबंधुता या मूल्यांची  शिकवण मिळते. गांधीजींची कृती आणि उक्ती यांच्यात काडीमात्रही फरक नसे. देशभर राबवल्या गेलेल्या स्वच्छता अभियानाला महात्मा गांधी यांचं नाव देण्यामागे त्यांची स्वच्छतेबाबतीत असणारी तत्त्वं कारणीभूत आहेत. स्वच्छता हा जगण्याचा अनिवार्य भाग आहे. याला अनुसरून वर्तनाचा गांधीजींनी आदर्श घालून दिला. स्वच्छता या तत्त्वाचा आधार स्वावलंबन हा आहे. मानवी मूल्यांना योग्य प्रतिष्ठा मिळावी हा त्यामागील सुप्त हेतू असे.  वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर, गाव, राज्य, देश यांच्या सीमेपलीकडेही स्वच्छतेमार्फत पाहण्याची दृष्टी विकसित होणे या मागचा गांधीजींचा उद्देश होता. श्रम करणा-या व्यक्तीचा सन्मान व्हावा. यासाठी श्रमदानातून स्वच्छतेचा मंत्र गांधीजींनी दिला. आज या विचारांना आलेलं स्वरूप उत्सवी असलं तरी तितकंच बेगडी आहे. हक्क आणि अधिकारांची मोजदाद करणारा माणूस कर्तव्यांच्या तराजूतलं माप जाणिवेनी कमी टाकताना दिसतो.

महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर राजकीयदृष्टय़ा केला जातो. अनेक नेते स्वत:ला त्यांच्या तोडीचं मानायलाही कमी करत नाहीत. त्यांचे कार्य, त्यांचा त्याग, तत्त्वनिष्ठा, विचार हे सारे अद्वितीय आहे यात शंका नाही. त्यामुळे अशी तुलना संयुक्तिक ठरत नाही. गांधीजींचे विचार घेऊन कोणी पुढे जात असेल तर ती कौतुकास्पद बाब आहे हे निश्चित. पण तेवढय़ाने त्यांची तुलना बापूजींशी होऊ शकत नाही. सध्याच्या काळात बापूजींचे विचार समजून घेणे हेच एक आव्हान आहे. कारण सध्या जो-तो स्वत:च्याच हिताचा विचार करण्यात रमला आहे. शिवाय विविध भौतिक सुखांकडील ओढा वाढला आहे. कोणत्या का मार्गाने होईना, मी हवे ते सुख मिळवणारच असा निर्धार केला जातो. त्यातून मग गरमार्गाचा अवलंब करण्याची वृत्ती बळावते. अशा परिस्थितीत समाजहिताचे भान बाळगणारे कितीजण उरले आहेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.  देशातील विविध क्षेत्रात वाढत असलेला भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, अन्याय-अत्याचार या समस्यांमागील कारणांचा शोध घ्यायचा तर सत्ता आणि संपत्तीचा अविवेकी हव्यास हेच प्रमुख कारण असल्याचे दिसते. त्यामुळे सामाजिक जाणिवा बोथट झाल्यास आश्चर्य वाटायला नको. अशा वेळी स्वत:मधील बदलाबरोबर समाजजागृतीची, देशहिताच्या प्रेरणेची ज्योत पुन्हा एकदा पेटवणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणा-या नि:स्वार्थी, निष्कलंक चारित्र्याच्या आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी असणा-या व्यक्तिमत्त्वांची आवश्यकता आहे.

आदर्श समाज हा देश विकासाचा आधारस्तंभ मानला जातो. कोणत्याही समाजाचा विशिष्ट आदर्शापर्यंतचा जो प्रवास होतो त्या मूल्यांमार्फत होतो ती मूल्यं गांधीजींनी देशाला दिली आहेत. अशा वेळी या मूल्यांचं पालन करणं प्रत्येकाचं नतिक कर्तव्य आहे. प्रत्येकाने मी कोणतेही नियम मोडणार नाही असा निश्चय करायला हवा. कारण भ्रष्टाचार विविध क्षेत्रात इतका खोलवर रुजला आहे की एका लोकपालाच्या नियुक्तीने किंवा कायद्याने त्याला आळा बसेल असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येकानेच लोकपालाची कर्तव्यं पार पाडायला हवीत. भ्रष्टाचाराला उत्तेजन देणं किंवा भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणं या बाबींना आळा बसला तर भ्रष्टाचार आपोआप आटोक्यात येईल. पण असा निश्चय करण्यासाठी आणि त्याप्रती प्रामाणिक राहण्यासाठी आत्मचिंतन महत्त्वाचं ठरणार आहे. बापूजींच्या सत्याग्रहात आत्मशुद्धीच्या तत्त्वाचा आवर्जून समावेश केला जायचा. किंबहुना, ते आत्मशुद्धीनंतर समाजशुद्धीकडे वळायचे. कार्यकर्त्यांनाही ते याच मार्गाने जायला सांगत. म्हणूनच त्यांच्या लढय़ाचे वेगळेपण प्रकर्षाने पुढे येते.

सामाजिक चळवळींमध्ये नेत्याची आत्मशुद्धी महत्त्वाची आहे. नेता भ्रष्टाचारी आहे किंवा चोर आहे असं मानायचं तर त्यात मीही कुठे ना कुठे भागीदार आहे याची जाणीव व्हायला हवी. किंबहुना, तशी कबुली देण्याचं धाडस अंगी असेल तरच ख-या अर्थाने सामाजिक सुधारणांचा पाया घातला जाऊ शकतो. याशिवाय कोणत्याही चळवळीला ‘मास बेस’ असला तरच ती यशस्वी होते याचीही जाणीव ठेवायला हवी. स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळी अशाच स्वरूपाच्या होत्या. म्हणून इंग्रजांची अनेक वर्षाची राजवट आपण उलथून टाकू शकलो. पूर्वी देशाला बाह्य आक्रमणाचा धोका होता. आता बाह्य आक्रमणापेक्षाही अंतर्गत समस्यांचे आव्हान वाढीस लागले आहे. हे संकट सोपे नाही. यावर वैयक्तीक सुधारणा आणि आत्मपरीक्षणाचा उपाय गरजेचा ठरणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा गांधीविचारांच्या प्रचार आणि प्रसारावर भर दिला जाणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर बापूजींची एखादी तरी शिकवण आचरणात आणायला हवी. उदाहरणच द्यायचे तर बापूजी ‘नेहमी सत्य बोलावे’ असे सांगत. आज बहुतेकांना या साध्या-सोप्या तत्त्वाचा विसर पडला आहे. खरे बोलण्यासाठी किंवा सत्याला सामोरे जाण्यासाठी धाडस लागते. हे धाडस चिंतनातून, आत्मशुद्धीतून, पारदर्शक व्यवहारातून अंगी बाणवता येते. पण याच बाबींकडे दुर्लक्ष होत असेल तर लोक असत्याच्या मार्गानेच चालत राहणार. म्हणून गरज आहे ती त्यांना सत्याच्या मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याची. ‘सत्याला मरण नाही’ या मंत्राचा जप आणि त्याप्रमाणे आचरण ठेवल्यास देशासमोर आणि समाजासमोर असलेले अनेक प्रश्न सहजगत्या सुटू शकतील या विषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही.

स्वातंत्र्यलढय़ातील जनतेची एकजूट  जुलमी सत्तेच्या विरोधात होती.  क्रांतिकारकांनी जनतेतील आत्मविश्वास पुन्हा निर्माण केला. त्यातून जनता परकीय सत्तेच्या विरोधात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली. त्यातून इतिहास घडला आणि इंग्रजांना हा देश सोडून जावे लागले. पण आज इतक्या वर्षानंतरही परकीयांच्या आक्रमणाचा धोका कायम आहे.  देशांतर्गत शत्रूही मोठय़ा प्रमाणात निर्माण होत आहेत. या घरभेद्यांना शोधून नेस्तनाबूत करायचे खरे आव्हान समोर उभे आहे. याशिवाय देश अनेक समस्यांनी पोखरत चालला आहे. थोडक्यात, ही संक्रमणावस्था आहे. त्यातून देश वाचवायचा आणि जनतेला ख-या अर्थाने स्वातंत्र्य, बंधुता प्रदान करायची असेल तर गांधीगिरी गरजेची आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट