मुंबई केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय, मुस्लिमान यांच्या हिताचे कायदे बदलले जात आहे.
मुंबई- मुंबई केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून गोरगरीब, कष्टकरी, दलित, मागासवर्गीय, मुस्लिमान यांच्या हिताचे कायदे बदलले जात आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता महाराष्ट्रात होती तेव्हा आम्ही मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले होते. मात्र राज्यात नव्या आलेल्या सरकारने तुमचे आरक्षण रद्द केले. ज्यांनी तुमच्या हक्काचे आरक्षण रद्द केले त्यांना धडा शिकवा, असे आवाहन राणे यांनी केले.
मी कोकणचा विकास कसा केला हे तेथील मुस्लिम बांधवांना विचारा, मला संधी द्या, तसाच विकास मी इथे करून दाखवीन, असे आश्वासनही राणे यांनी दिले.
वांद्रे पूर्व भारतनगर परिसरातील रहिवाशांशी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी संवाद साधला. त्यावेळी मुस्लिमांचे आरक्षण रद्द करणा-या सरकारवर राणे यांनी टीकेची तोफ डागली. आपले प्राधान्य विकासालाच राहील, असे आश्वासनही यावेळी त्यांनी रहिवाशांना दिले.