श्रावण महिन्यात अनेकजण केळीच्या पानावर जेवतात. नैवेद्यासाठीही केळीच्या पानाचा वापर करतात. पूर्वी लग्नकार्यातूनही केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा होती. केरळ, तामिळनाडूत अजूनही केळीच्या पानावरच जेवतात. तिथे तर हॉटेलमध्येही केळीच्या पानावर वाढतात. म्हणूनच समजून घेतेले पाहिजे की काय आहे केळीच्या पानावर जेवण्याचे महत्त्व.
हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची पूजा केली जाते. काही विशेष पूजन कर्मामध्ये या झाडाच्या पानांचा मंडपही तयार केला जातो. हे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होता आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते. वास्तूनुसार केळीचे झाड घराच्या समोर किंवा बागेमध्ये लावणे शुभ मानले जाते.
भारतातील काही भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे. केळीच्या पानांमधून मिळणारे फायबर चटई, जाड पेपर, पेपर पल्प बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्त्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडे अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजीसारखे पॉलिफिनोल्स एंटीऑक्सिडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सिडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सिडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.