प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या आणि नियुक्तीचे नायब राज्यपालांना अधिकार आहेत असे केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचनेव्दारे स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली – प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या आणि नियुक्तीचे नायब राज्यपालांना अधिकार आहेत असे केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचनेव्दारे स्पष्ट केले आहे.
प्रशासकीय विभागातील अधिका-यांच्या बदली तसेच त्यांच्या नियुक्तीबाबतचे अधिकार नायब राज्यपालांकडे असल्याचे या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अधिका-यांच्या नियुक्ती आणि बदल्यांवरुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात वाद सुरु आहे. याप्रकरणी केजरीवाल तसेच नायब राज्यापालांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशीही चर्चा केली होती. केजरीवालांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होते. मोदींच्या हस्तक्षेपानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, या अधिसूचनेवर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. नायब राज्यपालांच्या माध्यमातून मोदी सरकार अधिका-यांच्या नियुक्ती आणि बदल्याचे अधिकार आपल्या हातात ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.