नायाब राज्यपालांकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.
नवी दिल्ली – नायाब राज्यपालांकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून नोकरशहांची नियुक्ती आणि बदल्यांसंदर्भात नायाब राज्यपालांचे समर्थन केल्यानंतर केजरीवालांनी मोदींवर हा आरोप केला.
बदली आणि नियुक्तीचा करोडो रुपयांचा उद्योग आहे. मागच्या तीन महिन्यात आम्ही सत्तेवर आल्यापासून हा उद्योग बंद केला आहे. नायाब राज्यपाल कधी राज्याचा पाणी प्रश्न आणि वीज पुरवठयाची चौकशी करत नाहीत. पण बदली आणि नियुक्तीची माहिती घेतात. हे सर्व संशयास्पद आहे असा आरोप केजरीवालांनी केला.
नायाब राज्यापालांच्या माध्यमातून केंद्राला स्वत:ची माणसे दिल्लीमध्ये नेमायची आहेत. केजरीवालांनी पंतप्रधानांची तुलना ब्रिटनच्या राणीशी केली. भारत पारतंत्र्यात असताना सर्व सत्ता केंद्र राणीकडे होते तसेच सध्या सत्तेचे केंद्र पंतप्रधानांकडे आहे. माझी नायाब राज्यापालांबरोबर जंग नाही. आमची भ्रष्टाचारा विरुध्द लढाई सुरु आहे आणि त्याने नरेंद्र मोदी सरकार चिंतेत आहे. दिल्ली सरकारसाठी ते अडचणी निर्माण करत आहेत असे केजरीवाल म्हणाले.