कासव महोत्सवाच्या रूपाने नावारूपास आलेल्या सागरी किनारी वसलेल्या वेळास गावातील कासव संवर्धन प्रकल्पांतर्गत संरक्षित केलेल्या कासवांच्या घरटय़ांमधून यंदा डिसेंबरअखेर कसवाची पिल्ले समुद्रकिना-याकडे कूच करण्यासाठी सज्ज झाली आहेत़
मंडणगड – कासव महोत्सवाच्या रूपाने नावारूपास आलेल्या सागरी किनारी वसलेल्या वेळास गावातील कासव संवर्धन प्रकल्पांतर्गत संरक्षित केलेल्या कासवांच्या घरटय़ांमधून यंदा डिसेंबरअखेर कसवाची पिल्ले समुद्रकिना-याकडे कूच करण्यासाठी सज्ज झाली आहेत़ दुसरीकडे पर्यावरणातील विशेषत: समुद्रातील अंर्तगत व बाह्यरूपात झालेल्या बदलांचा फटका यंदाच्या हंगामाला बसण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे.
तालुक्यातील वेळास समुद्रकिना-यावर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी गेल्या आठ वर्षापासून येथील ग्रामस्थ व कासवमित्र संस्था यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे आतापर्यंत हजारो सागरी कासवांना जीवनदान मिळाले आहे. त्यामुळेच वेळाससारखे छोटेसे गाव जगाच्या नकाशावर आले आहे. कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी व त्यांच्या अभ्यासासाठी देशी-विदेशी पर्यटक कासव महोत्सवाच्या रूपाने चालणा-या अभियानात सहभागी होत असतात.
गेल्या वर्षापासून वनविभाग व ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या संचालनाचे काम हाती घेतले आह़े यंदाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच येथील समुद्रकिनारी कासवांच्या दोन घरटय़ांमध्ये २६४ अंडी सापडली आहेत़ अंडय़ांतून पिल्ले बाहेर पडण्यासाठी साधारणपणे ५० दिवसांचा कालावधी लागत असल्याने डिसेंबरअखेर पिल्ले घरटय़ामधून बाहेर पडतील, असा व्यवस्थापनाचा अंदाज आह़े या भागात नोव्हेंबर महिन्यात दोन घरटी सापडली. मात्र, यानंतर समुद्राच्या अंतर्गत भागात वादळामुळे मोठय़ा प्रमाणावर घडामोडी झाल्या आहेत़ समुद्राच्या पाण्यातील बदलत्या प्रवाहांबरोबरच पौर्णिमेच्या उधाणाच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर वाळू समुद्रकिना-याला आली आहे. या बदलांचा फटका मादी कासवांना समुद्राकडे येण्याच्या प्रक्रियेवर बसू नये, अशी येथील निसर्गप्रेमी ग्रामस्थांची अपेक्षा आह़े तसे झाल्यास त्याचा फटका अंडय़ांची संख्येवर बसू शकतो़
घरटयांमध्ये २६४ अंडी सापडली आहेत़ अंडय़ांतून पिल्ले बाहेर पडण्यासाठी साधारणपणे ५० दिवसांचा कालावधी लागत असल्याने डिसेंबरअखेर पिल्ले घरटय़ामधून बाहेर पडतील, असा व्यवस्थापनाचा अंदाज आह़े या भागात नोव्हेंबर महिन्यात दोन घरटी सापडली. मात्र, यानंतर समुद्राच्या अंतर्गत भागात वादळामुळे मोठय़ा प्रमाणावर घडामोडी झाल्या आहेत़ समुद्राच्या पाण्यातील बदलत्या प्रवाहांबरोबरच पौर्णिमेच्या उधाणाच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर वाळू समुद्रकिना-याला आली आहे. या बदलांचा फटका मादी कासवांना समुद्राकडे येण्याच्या प्रक्रियेवर बसू नये, अशी येथील निसर्गप्रेमी ग्रामस्थांची अपेक्षा आह़े तसे झाल्यास त्याचा फटका अंडय़ांची संख्या रोडावण्यामध्ये होऊ शकतो़