काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाबाबत मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दिल्लीत चर्चा होणार आहे. विधानसभेच्या जागांबाबत या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई – काँग्रेस आघाडीच्या जागावाटपाबाबत मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी दिल्लीत चर्चा होणार आहे. विधानसभेच्या जागांबाबत या बैठकीत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसकडून ए. के. अँटोनी आणि अहमद पटेल तर राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात ही चर्चा होणार आहे. निवडणुकीला आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाण्याचा निर्णय यापूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी घेतला होता.
त्यानुसार आता जागावाटप होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १४४ जागांची मागणी केली असली, तरी त्यावरून टोकाची भूमिका घेणार नसल्याचे पवार यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूर्वीचेच सूत्र कायम राहते, की बदलते हे दिल्लीतील बैठकीतून स्पष्ट होईल.