दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेनुसार मागील २० वर्षापासून कल्याण मुरबाड माळशेज माग्रे नगर रेल्वेमार्ग होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.
कल्याण – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेनुसार मागील २० वर्षापासून कल्याण मुरबाड माळशेज मार्गे नगर रेल्वेमार्ग होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. मात्र यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचा आरोप सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केला.
रविवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात रेल्वे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. हिंदुराव यांनी सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईतच होणार आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे विमानतळाच्या पुढील कार्यवाहीसाठी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच रायगड व ठाणेचे पालकमंत्री यांच्यासोबत सिडको संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. सिडकोच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे तळोजापर्यंत आली असून ही रेल्वे तळोजा-उल्हासनगर कल्याणमाग्रे मुरबाडपर्यंत आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. त्यासाठी आजूबाजूच्या पालिका नगरपालिकांनी तयारी दर्शवली पाहिजे.या रेल्वे परिषदेत मुंबई, ठाणे परिसरातील रेल्वेतून प्रवास करणा-या महिला रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाढवणे, गाडय़ांची स्वच्छता, बारा डब्यांची मागणी करण्यात आली.