आम्ही ‘जेएनयू’तील कन्हैया कुमार याला चच्रेला बोलावले आहे. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत. कन्हैया लवकरच पुण्यात येईल, अशीशा आहे.
पुणे – आम्ही ‘जेएनयू’तील कन्हैया कुमार याला चच्रेला बोलावले आहे. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत. कन्हैया लवकरच पुण्यात येईल, अशीशा आहे. भाजयुमो किंवा अभाविपच्या धमक्यांना आम्ही विद्यार्थी भीक घालत नाही, अशी भूमिका रानडे इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
कन्हैया कुमारला काही विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी संघटनांनी चच्रेला बोलावले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील (रानडे इन्स्टिटय़ूट) विद्यार्थ्यांनीही कन्हैयाला आमंत्रित केले आहे; मात्र ‘कन्हैयाकुमारला चच्रेला बोलवाल, तर बघून घेऊ,’ अशी धमकी भाजयुमोने दिली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कन्हैयाला आणण्याचा निर्धार केला आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात गेल्या मंगळवारी ‘जेएनयू का सच’ या विषयावर काही विद्यार्थ्यांनी मुक्त चच्रेचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते आलोक सिंह यांना बोलावण्यात आले होते. हा कार्यक्रम कॉलेजची अधिकृत परवानगी न घेता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अभाविपचे कार्यकत्रे आणि डाव्या विचारसरणीचे कार्यकर्त्यांत वादावादी झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला. त्यामुळे पुण्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींत वैचारिक वाद उफाळून आला आहे.
जेएनयूतील अभाविपचे नेते अलोक सिंह हे रानडे इन्स्टिटय़ूटमध्ये चच्रेला आले होते; मात्र प्रशासन व पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे अलोक सिंह आणि विद्यार्थ्यांत बंद गेटमधूनच चर्चा झाली. अलोक सिंह यांना अडचणीचे प्रश्न विचारताच ते रानडेमधील विद्यार्थ्यांसोबतची चर्चा अर्धवट सोडून निघून गेले होते. त्यानंतर रानडेमधील विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारला निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विद्यार्थी कन्हैया कुमारच्या संपर्कात आहेत. तसेच कन्हैयाने पुण्याला येण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र ‘कन्हैयाला बोलवाल तर त्याचा कार्यक्रम आयोजित करणा-या आयोजकाला बघून घेऊ व कार्यक्रमात तोडफोड करून चर्चा उधळून लावू.
ज्यांना कन्हैयाचे विचार ऐकायचे असतील; त्यांनी दिल्लीला जावे. त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च आम्ही करतो, जर पुण्यात कार्यक्रम केलात तर आम्ही आधी आयोजकांना पकडून ठोकून काढू,’ अशी धमकी भाजयुमोच्या पदाधिका-यांनी दिली आहे. यानंतर रानडेतील विद्यार्थानी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, रानडे इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांनी विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व विद्यापीठ प्रशासनाकडे अर्ज करून कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजयुमोच्याविरोधातील तक्रारीची प्रत पुणे विद्यापीठ प्रशासन, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पाठवण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबत भूमिका मांडताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, आम्ही अभविपचे विद्यार्थी नेते अलोक सिंह यांनाही चच्रेला बोलावले होते. त्यानुसार ते चच्रेला आले होते; मात्र पोलिस व प्रशासनाने परवानगी दिली नाही. आम्ही अलोक सिंह यांची भूमिका ऐकली. काही प्रश्नांचे उत्तरे ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे ते चर्चा अर्धवट सोडून निघून गेले. आता आम्ही कन्हैया कुमारला बोलवून त्याला काही प्रश्न विचारणार आहोत.
जेएनयूमधील ‘सच’ नेमके काय आहे, हे समजून घेणे आमच्यासारख्या तरुणांचे व पत्रकार विद्यार्थ्यांचे कामच आहे. भाजयुमो किंवा अभविपने यात अडथळा आणू नये. आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. आम्ही पोलिसांत तक्रार दिलेली आहे. विद्यापीठाकडे कन्हैयाच्या कार्यक्रमाला परवानगी मागितली आहे. कन्हैया कुमार लवकरच रानडे इन्स्टिटय़ूटमधील विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिसेल, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.