विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ज्या कच्चा कैद्यांनी एकूण शिक्षेच्या निम्मी शिक्षा तुरुंगात भोगली आहे त्यांना तात्काळ सोडून देण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
नवी दिल्ली – विविध गुन्ह्यांच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ज्या कच्चा कैद्यांनी एकूण शिक्षेच्या निम्मी शिक्षा तुरुंगात भोगली आहे त्यांना तात्काळ सोडून देण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.
मुख्य न्यायमूर्ती आर.एम.लोढा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जिल्ह्याच्या न्यायालयीन अधिका-यांना कच्चा कैद्यांची माहिती घेऊन त्यांच्या सुटकेचे आदेश द्यावेत असे निर्देश दिले आहेत.
न्यायालयीन अधिका-यांनी आठवडयातून एकदा त्यांच्या अधिकारक्षेत्रातील तुरुंगाना भेट देऊन कच्चा कैद्याची माहिती घ्यावी व ज्यांनी निम्मी शिक्षा भोगली आहे त्यांना सोडून देण्याचे आदेश द्यावेत असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
येत्या एक ऑक्टोंबरपासून दोन महिन्यांसाठी ही मोहिम सुरु होत आहे. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तुरुंगांना भेट देऊन कच्चा कैद्यांच्या प्रकरणांचा अभ्यास करावा व त्यांच्या सुटकेचे आदेश द्यावेत असे न्यायालयाने म्हटले आहे. आठ डिसेंबरला यावर पुढील सुनावणी होणार आहे.