बॉलिवूडची क्वीन अर्थातच कंगणा राणावत भले सोशल साईटसवर फारशी अॅक्टिव्ह नसेल.
मुंबई- बॉलिवूडची क्वीन अर्थातच कंगणा राणावत भले सोशल साईटसवर फारशी अॅक्टिव्ह नसेल. मात्र, ती आपल्या स्पष्टवक्तेपणाने नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिन्ने फिल्मफेअर या मासिकाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत विवाहित पुरुष तरुणींना जाळय़ात ओढण्याकरिता काय नाटके करतात. यावर टीकात्मक भाष्य केले. शिवाय विवाहेतर संबंध आपल्याला मान्य नाहीत, असे म्हणतानाच, तिच्या अन् हृतिक रोशनच्या नात्यावरही भाष्य केले आहे.
तिच्या मते, आयडियल हजबंड अन् ऑलरेडी हजबंडमधील सत्य ओळखण्यासोबतच तरुणींनी खासकरून स्वप्नाळू मुलींना तो स्वीकारता आला पाहिजे. बहुंताश १५ ते २५ वयोगटातल्या मुलींसमोर आयडियल हजबंडची एक आभासी प्रतिमा असते आणि म्हणूनच त्या नेमक्या अशा पुरुषांच्या जाळय़ात फसतात, जे की ऑलरेडी हजड असतात..
मला आजवर तरी एकही विवाहित पुरुष आपल्या बायकोबाबत आनंदी अन् समाधानी असलेला भेटला नाही. सरसकट सर्व विवाहित पुरुषांची ही मानसिकता असते की, एखादी अविवाहित तरुणी भेटली की, मग माझी बायको जगातील क्रूर अन् बेढब स्त्री आहे. मीच काय तो गरीब, समजूतदार आहे, असे दाखविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतो. मात्र, तरुणींनी नेहमीच अशा फसव्या नाटकांपासून अन् फसव्या पुरुषांपासून दूर राहिले पाहिजे.