शुक्रवारी पाडवा. हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी आपल्याकडे सकाळी अंघोळ झाल्यावर अनशापोटी कडुनिंबाच्या कोवळ्या पानं, गूळ, जिरं आणि हिंग घालून ती चटणी किंवा बारीकशी गोळी खाण्याची प्रथा आहे.
रोग निवारणासाठी ही गोळी खाल्ली जाते अशी त्या मागची समजूत आहे. म्हणजे येणारं र्वष निरोगी जावं ही त्यामागची भावना आहे. अशा या कडुनिंबाचे खरोखरच आयुर्वेदिक उपयोग दिले आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे उपयोग जाणून घेऊ या.
» कडुनिंबाच्या पानाचा रसाच्या सेवनाने रक्तदोष दूर होतात. रक्त शुद्ध होते.
» याच्या सेवनाने झालेली जखम किंवा गळू दूर होतात. त्यात पू होत नाही. कंड, व्रण किंवा फोड नाहीसे होतात.
» दोन ते तीन पानं रोज चावून खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते.
» ही पानं हवेतील धूळ, धूर शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात. प्रदूषण रोखायलाही त्यामुळे मदत होते.
» कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास हिरडया मजबूत होतात, तोंडाचं आरोग्य सुरक्षित राहते, दातातील कीड मरते, पायोरिया होत नाही. मौखिक कर्करोगालाही आळा बसतो.
» कडुनिंबाची पानं जाळल्यास मलेरिया आणि डेंग्यूच्या जीवाणूच्या वाढीला प्रतिबंध होतो.
» मधुमेही रुग्णांनी नियमित १५-२० पानांचा रस प्यावा. त्यामुळे रक्तातील आणि लघवीतील साखर कमी करतो.
» याच्या सेवनाने त्वचारोगही बरा होतो.
» वाळलेल्या पानांचा चुरा करून धान्यात टाकल्यास धान्याला कीड लागत नाही.
» रात्री झोपताना कानात कडुनिंबाचे तेल टाकल्याने कानात बुरशी होत नाही. कानातला मळ यायलाही मदत होते.
» पावसाळ्यात पायांच्या या दोन बोटांमध्ये होणारा चिखलीचा त्रास झाल्यास कडुनिंबाच्या तेलाचे दोन-तीन थेंब घालावेत म्हणजे चिखली पूर्णपणे बरी होते. पुन्हा होत नाही.