जर एखाद्याने कुत्र्याला दगड मारला तर त्यात सरकारचा काय दोष?, असे धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केले.
नवी दिल्ली- जर एखाद्याने कुत्र्याला दगड मारला तर त्यात सरकारचा काय दोष आहे?, असे धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केले. या विधानामुळे त्यांच्यावर टिकेचा भडिमार होत आहे. गाझियाबाद येथे गुरूवारी झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे विधान केले.
हरियाणामधील दोन दलित मुलांच्या हत्येशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हरियाणात झालेल्या हत्येचा संबंध सरकारशी जोडू नका, हे दोन कुटुंबामधील भांडण असून या प्रकरणाचा शोध पोलीस घेत आहेत, असे सिंह म्हणाले.
गाझियाबाद येथील घटनेसंदर्भात सरकार अपयशी ठरले आहे का?, असा सवाल पत्रकारांनी केला असता सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे विरोधकांकडून जोरदार टिका होत असून याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.