राज्याला दुष्काळाच्या झळांनी हैराण केले असून केंद्र सरकारकडून अद्याप पूर्ण मदत महाराष्ट्राला देण्यात आलेली नाही. अशा गंभीर स्थितीत केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील ‘पेयजल’ योजनांना निधी देणे बंद केले आहे.
मुंबई – राज्याला दुष्काळाच्या झळांनी हैराण केले असून केंद्र सरकारकडून अद्याप पूर्ण मदत महाराष्ट्राला देण्यात आलेली नाही. अशा गंभीर स्थितीत केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील ‘पेयजल’ योजनांना निधी देणे बंद केले आहे. त्यामुळे एक हजार गावांत पाणीपुरवठा योजना बंद असल्याची कबुली पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची येथे दिली.
[poll id=”1280″]
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे ग्राहकांसाठी ऑनलाईन पाणी देयक सुविधेचे उद्घाटन मंगळवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते असेही म्हणाले की, ‘ही सर्व कामे सुरू करण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र केंद्र सरकारने हा निधी देणे बंद केले आहे. त्यामुळे शेकडो गावांत पाणी पुरवठय़ांची कामे बंद असल्याची कबुली लोणीकर यांनी दिली. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना राज्यात राबवण्याचा प्रस्ताव आहे.