ठाणे येथून कापुरबावडीमार्गे मुंबईच्या दिशेने जाणा-या नव्या उड्डाणपुलावर पाच जागांवर अपघात होऊ शकतात.
ठाणे- ठाणे येथून कापुरबावडीमार्गे मुंबईच्या दिशेने जाणा-या नव्या उड्डाणपुलावर पाच जागांवर अपघात होऊ शकतात. याची माहिती एका दक्ष नागरिकाने देऊनही या पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुलावर वेग नियंत्रक (स्पीड ब्रेकर) लावण्यात आले. तेही उखडून गेले आहेत. त्यामुळे या पुलावर अपघात होण्याची शक्यता आहे.
ठाणे येथील कापुरबावडीहून मुंबईकडे जाणा-या एका नव्या उड्डाणपुलावर अपघात होऊ शकतील अशा ५ जागांची माहिती दक्ष नागरीक सत्यजित शहा यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, राज्य रस्ते विकास महामंडळ व एमएमआरडीए यांना दिली होती. या जागांविषयी माहिती देऊन त्यावर योग्य पावले उचलून अपघाताचा धोका टाळण्याबाबत मागणी केली होती.
मात्र, उड्डाणपुलावरील मुंबईकडे जाणा-या मार्गीकेचे उद्घाटन १७ ऑगस्ट, २०१५ रोजी झाले. उड्डाणपुलावरील धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आले. मात्र, या उद्घाटनानंतर यातील अनेक स्पीडब्रेकर उखडले गेले आहेत. नाशिकहून येणारी मार्गिका व ही मुंबईकडे जाणारी मार्गिका धोकादायक ठिकाणी एकत्र येतात.