पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम ‘मन की बात’ करत असतात.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम ‘मन की बात’ करत असतात. आता त्यांनी ‘हिंदुस्थानकी जनता के ‘मन की बात’ ऐकणे गरजेचे आहे, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
मोदी सरकार आमची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यात ते यशस्वी होणार नाहीत. आमच्या सर्व खासदारांना निलंबित केल्यावरही आम्ही सरकारवरील दबाव कमी करणार नाही. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कायदा मोडल्याने त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी कॉँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे.
काँग्रेसने भू-संपादनाबाबत संघर्षवादी भूमिका घेतल्यानंतर सरकारने आपल्या भूमिकेवरून पळ काढला आहे. आता आम्ही ललित मोदी व व्यापमंप्रकरणी सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान व वसुंधरा राजे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव कायम ठेवणार आहोत. भू-संपादन विधेयकाबाबत सरकार मोठमोठय़ाने ओरडत होते. धमक्या देत होते. आता त्यांनीच पलटी मारली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.