लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता केंद्रीय निवडणुक आयोगाकडून सोमवारी मागे घेण्यात आली आहे.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता केंद्रीय निवडणुक आयोगाकडून सोमवारी मागे घेण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या काळात आयोगाने नौदल प्रमुख, लष्कर प्रमुख आणि नैसर्गीक गॅस संदर्भातील निर्णय घेण्यास परवानगी दिली होती.
आचारसंहिता मागे घेण्यासंदर्भात निवडणूक समितीने पाच मार्चपासून लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेत असल्याचे सरकारला कळवले आहे. आयोगाने पाच मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर १६ मे रोजी निकाल जाहीर झाले होते. आयोगाने विजयी उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली.
आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाने रिझर्व्ह बँकेला बँकिंग परवाने जाहीर करण्याची परवानगी दिली होती.