ललित मोदी प्रकरण, व्यापम घोटाळयावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली – ललित मोदी प्रकरण, व्यापम घोटाळयावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या नेत्यांचा बचाव करत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. काँग्रेस महिला नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल यांनी मोदींच्या निवडणुक प्रचाराच्यावेळच्या संकल्पाची आठवण करुन दिली.
त्यावेळी मोदी म्हणाले होते ना खाऊंगा, ना खाने दूंगा मग मोदी आता राजस्थान आणि मध्यप्रदेशातील नेत्यांना पाठिशी का घालत आहेत ? पंतप्रधान राजस्थानात भ्रष्टाचार का चालू देत आहेत. ललित मोदीला ते केव्हा परत आणणार ? असे सवाल राहुल यांनी विचारले.