कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात भीषण पाणी टंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
डोंबिवली- कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात भीषण पाणी टंचाई भेडसावत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पाणीप्रश्नाबाबत महानगरपालिका निवडणुकीआधी येथील रहिवाशांनी विचार करायला हवा होता.परंतु शिवसेना व भाजपच्या भूलथापांवर विश्वास ठेवल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. असे मत मांडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांना ‘त्यांच्यावर विश्वास टाकलात ना, आता भोगा आपल्या कर्माची फळे’ अशी तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली.
डोंबिवली येथे मनसेच्या शहरातील नव्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे शनिवारी या ठिकाणी आले होते.
त्यावेळी त्यांनी पाणी प्रश्नाविषयी त्यांना पत्रकारांनी विचारले असता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मनसेचे शहर प्रमुख मनोज घरत, सरचिटणीस राजू पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते.