पुढील वर्षी जानेवारीत होणारे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन िपपरी-चिंचवड येथे होणार असून आयोजनाचा मान डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीला देण्यात आला आहे.
पुणे- पुढील वर्षी जानेवारीत होणारे ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड येथे होणार असून आयोजनाचा मान डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीला देण्यात आला आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष पी.डी. पाटील यांची संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली असून, संमेलन ‘न भूतो न भविष्यती’ असे करण्याचा विश्वास श्री. पाटील यांनी ‘प्रहार’शी बोलताना व्यक्त केला.
या संमेलनासाठी कर्नाटकसह १२ ठिकाणांची निमंत्रणे आली होती. सोसायटीने महामंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव महामंडळाने स्वीकारला आहे. ८८वे साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान येथे झाले होते. संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
हे संमेलन राज्याबाहेर असूनही साहित्यरसिकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता राज्याच्या उद्योगनगरीला हा मान मिळाला आहे. अभिमत विद्यापीठाच्या संकुलातच असलेल्या ५० एकर जागेवर संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे.
पंतप्रधानपदाची शोभा मोदींनी घालवली
पंतप्रधानपदाची शोभा मोदींनी घालवली, असा आरोप राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केला. मोदी यांना आता जनता गांभीर्याने घेत नाही. येत्या निवडणुकीत मंडलवाद पुन्हा जागृत होईल, अशीही भीती आहे. एका वर्षाच्या काळात मोदींनी कोणती कामे केली याची माहिती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.