देशाची अर्थव्यवस्था सध्या बिकट कालखंडातून जात असली तरी अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण लवकरच थांबेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली – जागतिक मंदी आणि इतर कारणांमुळे देशातील अर्थव्यवस्था सध्या बिकट कालखंडातून जात असली तरी अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण लवकरच थांबेल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.
मात्र, १२व्या पंचवार्षिक योजनेतील ९टक्के विकासदराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पोषक असलेल्या अनेक घटकांचा आधार घ्यावा लागेल आणि त्यामध्ये शिक्षण हा घटकही महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. येथे आयोजित केलेल्या अभियांत्रिकी परिषद २०१३चे उद्घाटन करताना ते बोलत होते.
अलीकडच्या काळात भारताचा आर्थिक विकासदर कमी झाला असला तरी ही प्रक्रिया थांबवण्यात आणि पूर्वीचा उच्च विकास दर साध्य करण्यात आम्हाला यश येईल, असे त्यांनी सांगितले. हा विकासदर गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या काही उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या.