अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुन्हा वातावरण तापवण्याची योजना सुरू केली आहे.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/08/Sadhus-walking-at-Ayodhya-Railway-Station.jpg)
लखनौ – मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून आता ‘घरवापसी’सारखे कार्यक्रम जोरात सुरू असतानाच अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुन्हा वातावरण तापवण्याची योजना सुरू केली आहे. दुर्गा पूजेच्या धर्तीवर विहिंपने पहिल्यांदा ‘राम महोत्सव’ आयोजित करण्याचे ठरवले आहे.
२१ किंवा २२ मार्च ते एक एप्रिलदरम्यान देशभरात राम महोत्सव आयोजिला जाणार आहे. देशातील दीड ते दोन लाख गावांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. अयोध्येतील राम मंदिर बांधण्यासाठी या मोहिमेचा फायदा होईल, असे विहिंपचे प्रसारमाध्यम प्रमुख शरद शर्मा यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक मंदिरात हा कार्यक्रम होईल. या महोत्सवात रामाच्या मूर्तीची १० दिवस पूजा केली जाईल. त्यानंतर त्याचे विसर्जन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.