सलग तीन विजयानंतर भारताच्या पुरुष आणि महिला संघाला बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये शुक्रवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले
इस्तंबूल – सलग तीन विजयानंतर भारताच्या पुरुष आणि महिला संघाला बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये शुक्रवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले. भारताच्या पुरुष संघाला अमेरिकेने 2-2 अशा बरोबरीत रोखले. महिलांनाही सर्बियाविरुद्ध त्याच फरकाने गुण विभागून घ्यावे लागले.
ग्रॅँडमास्टर कृष्णन शशीकिरणला पाचव्या मानांकित अमेरिकेच्या हिकारू नाकामुराकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. तत्पूर्वी, परिमार्जन नेगी आणि अभिजित गुप्ता यांचे डाव बरोबरीत संपल्यावर पी. हरिकृष्णने विजय नोंदवत भारताला सलग चौथ्या विजयाची आशा दाखवली होती. अमेरिकेविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागल्याने भारताची संयुक्तपणे पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
महिला गटात सर्बियाविरुद्ध भारताकडून ईशा करवडे आणि तानिया सचदेवने विजय मिळवत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र डी. हरिका आणि मॅरी अॅन गोमेसचे डाव बरोबरीत संपल्याने भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.