सध्या स्थायी समिती जिंकली आहे. अडीच वर्षाने महापौरपदजिंकू, असा विश्वास उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
ठाणे – सध्या स्थायी समिती जिंकली आहे. अडीच वर्षाने महापौरपदजिंकू, असा विश्वास उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांच्या पालिकेतील नव्या कार्यालयाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात काँग्रेसने सर्वाचाच धुव्वा उडवला. तेथे सर्वत्र काँग्रेसचीच सत्ता असल्याचे सांगत ठाणे महापालिकेतही लवकरच हेच चित्र पाहावयास मिळेल, असे राणे यांनी ठामपणे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे भवितव्य काय, असे पत्रकारांनी विचारले असता, शिवसेनेच्या कार्याध्यक्षांच्या महाराष्ट्र दौ-यानंतरच शिवसेनेच्या भवितव्याबद्दल बोलणे योग्य ठरेल, असे राणे म्हणाले. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख या पदाबाबत उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचेही ते पुढे म्हणाले.