अजित पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्यच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
मुंबई- अजित पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्यच असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांच्या आरोपानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
सिंचन प्रकल्पासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्यास आपला पाठिंबा असल्याचे पवारांनी सांगितले. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र राष्ट्रवादीचा असा कोणताही विचार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. राज्यात अस्थिरता निर्माण करायची नसल्याचे शरद पवारांनी सांगितले. यासंदर्भातील निर्णय घेण्यास पक्षश्रेष्ठी सक्षम असल्याचे त्यांनी नमूद केले.
सिंचन घोटाळ्यासंदर्भातील सत्य लोकांसमोर आले पाहिजे असेही शरद पवारांनी सांगितले. अजित पवारांच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.
[EPSB]
अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली.
[/EPSB]