सिंधुदुर्ग जिल्हयाच्या उत्तर सीमेवर शेतीला माता समजून शेतीची सेवा करणारे चिंचवली गावातील शंकर तुकाराम पेडणेकर आणि दिलीप जयराम शिर्सेकर ही शेतक-यात कष्ट करण्याची असणारी वृत्ती या व्यतिरिक्त आणि काय हवे!
खारेपाटण- सिंधुदुर्ग जिल्हयाच्या उत्तर सीमेवर शेतीला माता समजून शेतीची सेवा करणारे चिंचवली गावातील शंकर तुकाराम पेडणेकर आणि दिलीप जयराम शिर्सेकर ही शेतक-यात कष्ट करण्याची असणारी वृत्ती या व्यतिरिक्त आणि काय हवे!
हिरवीगार शेती फुलवण्यासाठी चिंचवली गावात तिन्ही हंगामात विविध पिके घेतली जातात. शेतीपासून तळकोकणातील शेतकरी उत्पन्न यांचा मेळ बसत नाही. म्हणून शेतीपासून दूर चाललेला शेतकरी पुन्हा चिंचवली गावात मातीला माता समजून शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती करत आहे.
खारेपाटण शहराला चिंचवली गावातून ताज्या पालेभाज्या आणि नवलकोल, वांगी, पावटा, कुळीथ, भेंडी, गावठी मिरची, टॉमेटो, मुळा विविध भाजीपाला पुरविला जातो.
आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करून जादा उत्पादन काढणारे शेतकरी म्हणजे चिंचवली येथील शंकर तुकाराम पेडणेकर! ते आणि त्यांचे घरातील सर्व मंडळी मुलगा किशोर शंकर पेडणेकर, सून सौ. वरूणा पेडणेकर, पत्नी सौ. संगीता आणि बहीण मेघा शिवगण सर्व कुटुंब शेतीमध्ये राबत असतात. शेतीची माहिती ते इतर शेतक-यांना आपल्या शेतावर देतात.
सध्या पालेभाज्याबरोबर नवलकोल यांचे उप्तादन मोठया प्रमाणात घेत आहेत.डिसेंबर महिन्यात ५० रुपये नवलकोलचे बी आणून ती पेरणी करण्यात आली.
३० दिवसात नवलकोल तयार झाला. या थंडीच्या हंगामात दर्जेदार नवलकोल आल्यामुळे जानेवारी महिन्यापासून नवलकोलात विक्रीला आणला गेला. तीन कांदे बांधलेली जुडी १० रुपये विक्री केली गेली.
सुमारे ८ गुंठयामध्ये नवलकोलची शेती केली गेली. याला कृषी उद्योग ५० किलो खत घातले गेले. सुमारे सर्व खर्च १०० रुपये झाला आणि महिन्याभरात सुमारे १५ हजार रुपयांचे नवलकोल विक्री करण्यात आले.
सुमारे एका एकरामध्ये विविध भाजीपाल्याचे उत्पादन काढले जाते. त्यात मुळा, वांगी, गवार, भेंडी, कोथिंबीर, लाल रंगाच्या पालेभाज्या असतात. ४ गुंठयामध्ये त्यांनी कोथिंबिरीचाही मळा तयार केला आहे.
डिसेंबरमध्ये कोथिंबीरचे बी पेरणी झाली. दीड महिन्यात तयार होते ही, हंगाम मार्च परत असतो. ३५० रुपये बी त्यापासून सुमारे ३० हजार रुपयांची कोथिंबीर विक्री केली जाते.
सध्या ५ रुपये पेंडीच्या दराने खारेपाटण बाजारपेठेत दरदिवशी सुमारे २०० नग विक्री होतात. दिलीप शंकर पेडणेकर सर्व प्रकारच्या भाज्या रिक्षातून घेऊन जातात. सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत अर्धा वेळ ते खारेपाटण बाजारात विक्रीला बसतात. त्यांच्याकडे १०० नग नवलकोल असतात.
२०० पेंडी कोथिंबीर असते, मुळा असतो, वांगी असतात, अन्य भाज्या असतात. सुमारे पंधराशे किंवा बाराशे रुपयांची विक्री होते. शनिवारी आठवडयाच्या बाजारात ते दुप्पट माल विक्री करतात. दिवाळीपासून ते जूनपर्यत भाज्या विक्री करतात. सुमारे दोन लाखापर्यंत शेतामध्ये उत्पादन घेतले जाते.
शंकर पेडणेकर यांच्या बरोबर दिलीप शिर्सेकर आपला उदनिर्वाह शेतीवरच करतात. ते ही नवलकोल वांगी मुळा विविध प्रकारची पालेभाज्यांचे उत्पादन घेतात. त्यांचा शेतीवरच संसार चाललेला असतो. विक्री व्यवस्था चिंचवली गावात पिकवल्या जाणा-या शेतमालाची विक्री व्यवस्था ही वैशिष्टयपूर्ण आहे.
येथील शेतकरी हे आपण पिकविलेला माल स्वत: खारेपाटण या गावात विक्री करतात. मधील दलाल व्यापारी वगळल्यामुळे ताजा शेतीमाल मिळत असल्याने ग्राहक व शेतकरी यांना दोघांना त्याचा फायदा होतो.
सुखनदीतून पंपाद्वारे पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था आहे. शेती पंप पॉवर टिलर आधुनिक शेती करीत आहे. पाणी पुरवठयाचे योग्य नियोजन करतात. प्रत्येकांच्या शेतात वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून दिवसभर शेतीची राखण असते.
खरे तर मुंबईहून मनिऑर्डरची वाट पहाणारी गावे म्हणजे कोकण असे म्हटले जायचे पण आज मोठया प्रमाणात हे चित्र बदलले आहे. शंकर पेडणेकर यांच्या विषयी बोलायचे तर गावातून मुंबईला असणा-या कुटूंबियांना ते पैसे पाठवतात.या शिवाय येथे त्यांचा परिवार सुखात आहे. सारी शेतीची कृपा असे ते सांगतात. कष्ट करणा-यांना ही माती कधीच संकटात टाकत नाही। आणखी काय हवे? असे ते सांगतात.