राज्यात दहावीचा निकाल जाहीर होण्यास केवळ काही आठवडय़ांची शक्यता असतानाच बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागातील महाविद्यालयांमध्ये होणा-या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
मुंबई- राज्यात दहावीचा निकाल जाहीर होण्यास केवळ काही आठवडय़ांची शक्यता असतानाच बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागातील महाविद्यालयांमध्ये होणा-या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
यामुळे या प्रक्रियेचा अतिरिक्त ताण विद्यार्थ्यांवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या प्रवेशासाठी महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचा-यांसह अधिका-यांचेही प्रशिक्षण पूर्ण झाले असले तरी प्रवेशासाठीची पुस्तिका वाटप करण्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू केली जाईल यासाठीचा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी पुण्यामध्ये पुस्तिका वाटण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
अकरावीच्या विविध अभ्यासक्रमांसाठी काही दिवसांनंतर ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या वर्षासाठी १ लाख ४९ हजार ८८ जागा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यंदा १३ हजार ९३ने जागांमध्ये घट करण्यात आली आहे.