Nawab Malik : काकांची साथ सोडून दादांना पाठिंबा… राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ‘ते’ ४२ वे आमदार नवाब मलिक!

Share

शरद पवारांना मोठा धक्का

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) २ जुलै या दिवशी मोठी फूट पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे शरदकाका विरुद्ध अजितदादा हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही गट आपल्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचे दावे करत आहेत. यावर निवडणूक आयोगात पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, त्याआधीच शरद पवार (Sharad Pawar) गटाला एक मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते नवाब मलिक (Nawab Malik) अजितदादांना पाठिंबा देणार आहेत. अजित पवार गटाने आपल्या बाजूला ४२ आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार असणार आहेत.

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची आजारी असल्याच्या कारणामुळे जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरु केले होते. तुरुंगातून बाहेर आल्यावर दोनच दिवसांत दोन्ही गटांच्या पदाधिकारी व नेत्यांनी नवाब मलिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळेस नबाव यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. काही दिवसांत आपला निर्णय कळवेन असं ते म्हणाले होते. त्यांच्या बोलण्यावरुन आणि इतर प्रतिक्रियांवरुन ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता जास्त होती. मात्र, सर्व अंदाज आणि तर्कवितर्क चुकीचे ठरवत नवाब मलिक यांनी अजितदादांना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.

निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, अशी माहिती आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटांनी पक्ष आपलाच असल्याचं सांगत दावे-प्रतिदावे केले आहेत. याबाबत पुढील सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

3 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

5 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

5 hours ago