नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तिसरा डोळा बंदच!

Share

नवी मुंबई : महानगरपालिका हद्दीत कोट्यवधी रुपये खर्च करून नऊ वर्षांपूर्वी तिसरा डोळा असणारे सीसीटीव्ही कॅमेरे विविध भागात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित करण्यात आले. परंतु त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वाताहत झाली आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नवी मुंबईकर वाऱ्यावर असलेले दिसून येत आहे.

दरम्यान एखाद्या वाईट किंवा चांगली घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या घटकांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. यामुळे नवी मुंबईकर नाराजीचा सूर आळवत आहेत.

सायबर सिटी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगपलिका क्षेत्रात २०१२/१३मध्ये दिघा ते बेलापूर परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी साधारणतः २०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु आजच्या घडीला मनपा विद्युत विभागाचे असणारे दुर्लक्ष तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखभाल व दुरुस्तीअभावी सीसीटीव्ही यंत्रणेची वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी एखादा सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. त्याठिकाणी एखादी घटना घडली असेल त्यासंबंधी चित्रफीत पाहण्यास गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने नागरिकांना आल्या पावली वापस घरचा रस्ता पकडावा लागत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण करण्यामागचा उद्देश हा गुन्हेगारी वृत्तीवर प्रतिबंध आणणे हे आहे. तसेच एखादा दुर्दैवी गुन्हा, घटना घडल्यानंतर त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास जास्त फायदा होत असतो; परंतु मनपा प्रशासन व ठेकेदारांच्या बेफिकिरीमुळे मूळ उद्देशच लोप पावला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये मनपाकडून सुरू करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी सुमारे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त कॅमेरे बंद असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु आता जे आमदार निधीमधून नव्याने काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले आहेत. ते मात्र सुस्थितीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

योजना राबविल्या जातात पण….

मनपाची स्थापना झाल्यापासून आजतागायत अनेक योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण योजना राबविल्यानंतर दुर्लक्ष झाल्याने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. यामध्ये उद्यान, तलाव व्हिजन यासहित इतर ठिकाणे कोमेजली आहेत. पुढील काळात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काळजी घेतली नाही, तर कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माझ्या घराच्या खिडकीची काच अज्ञात व्यक्तींनी १ ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास फोडली. काच कोणी फोडली हे सीसीटीव्ही फुटेजवर पाहण्यासाठी मी घणसोली विभाग कार्यालयाशी संपर्क साधला. पण, आजूबाजूला असणारे तीनही कॅमेरे बंद असल्याचे सांगितले गेले. – दर्शना देशमुख, गृहिणी, घणसोली

जे जे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते तत्काळ शोधून दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. – सुनील लाड, कार्यकारी अभियंता, विद्युत

Recent Posts

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

13 mins ago

ठाकरेंची भाषणे म्हणजे ‘सुक्या गजाली’

माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…

43 mins ago

पुढच्यास ठेच; पण मागचा शहाणा झाला?

मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…

1 hour ago

SRH vs RR: भुवनेश्वरच्या गोलंदाजीपुढे राजस्थान फेल, हैदराबादचा १ रनने रोमहर्षक विजय…

SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…

2 hours ago

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…

5 hours ago

तुम्ही Google Pay अथवा Phone pay चा वापर करता तर जरूर वाचा ही बातमी

मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…

5 hours ago