नवी मुंबई (वार्ताहर) : कोरोनाला हरवायचे असेल आणि संभाव्य लाटेला थांबवायचे असेल, तर लसीकरणावर भर देऊन, नागरिकांना संरक्षित करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार आता शहरात शंभराहून अधिक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पहिली आणि दुसरी मात्रा दिली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ५० टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली असून ९७ टक्के नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.
लसीकरणाच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेला शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. कोरोनापासून संरक्षित होण्यासाठी सुरक्षा नियम पाळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरण करून स्वतःला संरक्षित करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
त्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून नवी मुंबईत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिकेने हा टप्पा गाठला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबरपर्यंत १६ लाख १६ हजार ११३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ९७ टक्के आहे. दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. यावरून लसीकरणात महापालिका पुढे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाल्याने पुणे पोलीस आयुक्तांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी…
मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपर्यंत अतिरिक्त गुण मिळत असलेले…
मुंबई विभागाने मात्र गाठला तळ मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बारावीचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत…
जाणून घ्या सध्याचे दर काय? नवी दिल्ली : गेल्या महिन्यात सोन्याने विक्रमी पातळी गाठली होती.…
रस्त्यावर आढळली फ्लेमिंगोची पिसे आणि सांगाडे; मृत्यूचं कारण मात्र अस्पष्ट मुंबई : मानवाने केलेल्या पर्यारणाच्या…
कार्यक्रमात दिसणार संस्कृतीची झलक; तब्बल २५ हजार महिलांचा समावेश लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election…