पनवेल: न्हावा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटना आणि एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी (दि. ४) बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सेतू प्रकल्पात बाधित होत असलेल्या उर्वरित मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.
ते म्हणाले की, सेतूमुळे बाधित होणाऱ्या गव्हाण, न्हावा, जासई, वहाळ, उलवे, तरघर, मोहा, मोरावे परिसरातील सर्व मच्छीमारांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही त्यांना ती मिळावी यासाठी एमएमआरडीएकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी. यावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पात्र मच्छीमारांची कागदपत्रे तपासून ती पुढे पाठवू, तसेच या प्रक्रियेसाठी मंगळवारी व गुरुवारी येथे येऊन पडताळणी करू, असे आश्वासन दिले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…
पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…