Categories: ठाणे

भाईंदरमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानमित्त जनजागृती कार्यक्रम

Share

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या अभिनव महाविद्यालयात बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रीय मतदार दिनानमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्र विभागाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या मतदार जनजागृती कार्यक्रमात एकूण ६८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कार्यक्रमात विनय पाल व झोहराशेख या विद्यार्थ्यांनी ‘मतदानाचे महत्व’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यासोबतच मतदारांसाठी असलेली प्रतिज्ञाही घेण्यात आली. या कार्यक्रमाला मतदार नोंदणी अधिकारी १४६ ओवळा माजिवाडा मतदार संघ यांचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले होते. ठाणे तहसिलदार आशिष बिरादर व मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग अधिकारी योगेश गुनिजन यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. अभिनव महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ आणि प्राचार्य डॉ.आॉल्विन मेनेजेस यांनी देखील कार्यक्रमा दरम्यान प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयाचे लिपिक संतोष पेढणेकर यांचे मोलाचे योगदान होते. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरूणा गूजर, प्राध्यापक नितिन सोनावणे यांनी कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

56 mins ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

2 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

3 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

3 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

3 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

3 hours ago