नंदुरबार : राज्यभरात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये (Government Schools) विद्यार्थ्यांच्या संख्येला गळती लागल्याचे म्हटले जाते. अनेक आंतरदेशीय शाळा तिथल्या सोयीसुविधांमुळे पालकांना आकर्षित करतात आणि कधीकधी तेवढी क्षमता नसतानाही पालक आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये दाखल करतात. याचं एक कारण म्हणजे अशा शाळांमध्ये उपलब्ध असणारं आधुनिक प्रकारचं डिजीटल शिक्षण. याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण मिळावे, याकरता नंदुरबार नगरपालिकेने (Nandurbar Municipality) मोठे पाऊल उचलले. यामुळे पालकदेखील सरकारी शाळांकडे वळत आहेत व चित्र बदलत आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी नंदुरबार नगरपालिकेने या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेच्या १२ शाळांपैकी पाच शाळांमधील एक वर्गखोली डिजिटल (Digital classroom) करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे. पालिकेच्या शाळांमधील हे दर्जेदार शिक्षण आपल्या पाल्यांना देण्यासाठी पालकांचा ओढा पालिकेच्या शाळांकडे वाढल्याचे दिसत आहे.
हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) सी एस आर फंडातून (CSR Fund) ४० लाखांची मदत मिळवली. या निधीतून नगर पालिकेच्या १२ शाळांमधून ५ शाळांमधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा खर्च आला आहे.
या डिजिटल क्लासरूम साठी ६५ इंची डिजिटल टीव्ही (Digital TV) ,प्रोजेक्टर (Projector), १० बेंचेस, कार्पेट अशा आधुनिक वस्तू देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले.
कोविड काळात फी भरली नाही तर ऑनलाइन शिक्षणही नाही असा मार्ग बहूतांशी खाजगी शाळांनी निवडला. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन तर जिथे शक्य नाही तेथे ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते. मोफत शिक्षण, प्रत्यक्ष संवाद, गुणवत्ता सुधार, सेमी इंग्रजी यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढू लागले आहेत. यावर्षी १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार नगरपालिकेसारखे आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील अनेक शाळांनी राबवले तर शाळा बंद पडणार नाहीत.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…
मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…
रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…
मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…