माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, एका समाजाचे कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो

Share

मुंबईवरील वक्तव्यावर राज्यपालांचे स्पष्टीकरण

मुंबई : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, एका समाजाचे कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याबाबत खूलासा केला आहे.

“मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असे राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

“पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो,” असे राज्यपालांनी नमूद केले. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असेही त्यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

 

Recent Posts

घराचं घरपण बाबा…

माेरपीस - पूजा काळे रोज नव्या कर्तव्याची ज्याला आहे जाण बाबा भरून काढतो आयुष्याचे पान.…

10 mins ago

NCERT : बाबरी मशिदीचा उल्लेख ‘तीन घुमट रचना’, अयोध्या वाद चारवरुन दोन पानांवर!

एनसीईआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात अनेक मोठे बदल मुंबई : एनसीईआरटीचे (National Council of Educational Research…

21 mins ago

Salman Khan : गोळीबारानंतर बिश्नोई गँगची भाईजानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan)…

43 mins ago

ST Bus : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटी प्रशासनाने राबवली ‘ही’ विशेष मोहिम

आता एसटी पाससाठी रांगेत ताटकळावं लागणार नाही मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Bus) बसेसमधून प्रवास…

51 mins ago

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार! कन्नड शाळांमध्ये चक्क ११ मराठी शिक्षकांची नियुक्ती

नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने धरला जोर सांगली : सांगली जिल्हा परिषदेचा (Sangli Zilla Parishad) अजब…

3 hours ago

Post Office Scheme : आनंदवार्ता! पोस्टाने आणली ‘ही’ भन्नाट योजना

गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे…

4 hours ago