जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाची हत्या

Share

पेण :पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाची जमिनीच्या वादातून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. फरार खुनी भावाला दादर सागरी पोलिसांनी काही तासातच पनवेल येथून अटक केली.

सविस्तर घटना अशी की, फिर्यादी संतोष राम पाटील (वय ४०, रा. हनुमानपाडा) यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील (रा. हनुमानपाडा) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या गुरांच्या वाड्याच्या वाटपावरून वाद चालू होता. रविवार २६ डिसेंबर रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला. सदर वाद मिटल्यानंतर संतोष पाटील व त्याची आई प्रभावती पाटील हे दोघे त्याबाबत तक्रार देण्यास दादर सागरी पोलीस ठाण्यात आले असल्याचे पाहून पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील (सर्व राहणार हनुमानपाडा, ता. पेण) हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात जाऊन त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ करून पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणारी बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार करून यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तिच्या माहितीवरून सदर पथक पनवेल येथे जाऊन शिताफीने पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ३०२/३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५/२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेण :पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील सख्ख्या भावानेच आपल्या सख्ख्या भावाची जमिनीच्या वादातून घराच्या अंगणात हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. फरार खुनी भावाला दादर सागरी पोलिसांनी काही तासातच पनवेल येथून अटक केली.

सविस्तर घटना अशी की, फिर्यादी संतोष राम पाटील (वय ४०, रा. हनुमानपाडा) यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील (रा. हनुमानपाडा) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या गुरांच्या वाड्याच्या वाटपावरून वाद चालू होता. रविवार २६ डिसेंबर रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला. सदर वाद मिटल्यानंतर संतोष पाटील व त्याची आई प्रभावती पाटील हे दोघे त्याबाबत तक्रार देण्यास दादर सागरी पोलीस ठाण्यात आले असल्याचे पाहून पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील (सर्व राहणार हनुमानपाडा, ता. पेण) हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात जाऊन त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ करून पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणारी बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार करून यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे तिच्या माहितीवरून सदर पथक पनवेल येथे जाऊन शिताफीने पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ३०२/३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५/२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago