Categories: क्रीडा

मुंबईचा आरसीबीवर रॉयल विजय

Share

महिला प्रीमियर लीग

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : अ‍ॅमेलिया केरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मंगळवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघावर ४ विकेट राखून रॉयल विजय मिळवला. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा हा सहावा विजय आहे.

आरसीबीने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईने दमदार सुरुवात केली. हायली मॅथ्यूज (२४ धावा) आणि यश्तिका भाटीया (३० धावा) यांनी ५३ धावांची सलामी करत मुंबईला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले. त्यानंतर हरमनप्रीत कौर, नॅट स्कीवर ब्रंट या झटपट बाद झाल्यामुळे आरसीबीने सामन्यात पुनरागमन केले. अ‍ॅमेलिया केरने नाबाद ३१ धावा तडकावत मुंबईचा विजय निश्चित केला. तिला पूजा वस्त्रकारने १९ धावांची साथ दिली. मुंबईने १६.३ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी सामन्यात टॉस जिंकून मुंबई संघाने प्रथम गोलंदाजी करत आरसीबीला १२५ धावांवर रोखले. अगदी पहिल्या षटकापासून मुंबईने भेदक गोलंदाजी केली. अवघ्या एका धावेवर बंगळुरुची पहिली विकेट पडली. त्यानंतर स्मृती मन्धाना आणि एलिस पेरीने काहीस डाव सावरला. स्मृतीने २४ धावा, तर एलिसा पेरीने २९ धावा केल्या. रिचा घोषने खालच्या फळीत २९ धावा फटकावत बंगळुरुला कसेबसे १२५ धावांपर्यंत पोहचवले. अ‍ॅमेलिया केरने सर्वाधिक ३, तर इस्सी वोंग आणि नॅट ब्रंटने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर साईका इशाकने एक विकेट घेतली.

Recent Posts

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

31 mins ago

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

2 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

7 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

10 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

11 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

11 hours ago