सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa highway) पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र जुलै २०१९ मध्येच या गोष्टीची दखल घेतली. त्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाचे महत्त्व कोकणवासीयांना आता कळले आहे. त्यामुळे त्यावेळेस या आंदोलनाला विरोध केलेल्या विरोधकांना चांगलीच अदद्ल घडली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने २०१९ मध्ये नितेश राणे यांनी संबंधित अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. या गोष्टीला तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी नितेश राणेंची गुंडगिरी संबोधून विरोध केला व कारवाईची मागणी केली. रत्नागिरी-रायगडची (Ratnagiri Raigad) जनता ह्याच शिवसेना नेत्यांना पाठिंबा देत होती. त्यामुळे नितेश राणेंना आठ दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. मात्र, काहीतरी मिळवण्यासाठी त्यागही करावाच लागतो, या उक्तीप्रमाणे नितेश राणे या गोष्टीलाही सामोरे गेले.
अखेर, राजकारणात आपली स्वतःची एक वेगळी स्टाईल निर्माण केलेल्या राणे परिवारातील नितेश राणे यांच्या आंदोलनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलदगतीने संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण होऊन दीड वर्षापूर्वीच चौपदरीकरण पूर्ण झाले. शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाठिंबा देणाऱ्या रत्नागिरी-रायगडची इच्छाशक्ती मात्र कमी पडली. चिपळूणचा वाळूचोर भास्कर जाधव हायवे ठेकेदारांच्या पैशांवर मुलाचे थाटामाटात लग्न करत होता पण त्याला जनता दिसत नव्हती. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम पूर्ण झालं मात्र रायगड-रत्नागिरीमध्ये ते होऊ शकलं नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या असलेल्या खड्ड्यामुळे लोक आक्रमक झाले आहेत तेव्हा आता बाकीच्या पक्षातील लोकांना दुरुस्तीबद्दल सुचू लागलं आहे. पण त्यामुळे केवळ निवडणूक जवळ आल्यानेच या महामार्गाचं राजकारण केलं जात आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे. त्यावेळेस नितेश राणेंच्या विरोधात उभे राहिलेल्यांना देखील आता या आंदोलनाचं महत्त्व कळू लागलं आहे. जे बाकी पक्षांना आता कळतंय ते नितेश राणेंना चार वर्षांपूर्वीच कळलं होतं. शेवटी खरा विकास कोण करु शकतं आणि भावनिक खोटं राजकारण कोण करतं हे जनताच ठरवेल.
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या…