आमदार नितेश राणे यांचा ओरिएंटल स्कूल ऑफ मॅनेजमेंटला दणका

Share

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई येथील ओरिएंटल स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या मॅनेजमेंटला भाजप आमदार नितेश राणे यांनी दणका दिल्यानंतर १२० विद्यार्थ्यांना आता परीक्षेला बसण्याची मुभा प्राप्त झाली आहे.

नवी मुंबई येथील वाशी-सेक्टर १२ येथील ओरिएंटल स्कूल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या १२० विद्यार्थ्यांना कोविडच्या कारणामुळे पूर्ण फी भरता आली नव्हती. महाराष्ट्रातील आणि कोकण-देवगड येथील हे १२० विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते. यामुळे त्यांचे वर्षही वाया जाणार होते. मात्र आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी प्राप्त झाली आहे.

परीक्षेला बसण्याची परवानगी दिल्यामुळे १२० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचले आहे. कोविडच्या कारणामुळे कॉलेजची पूर्ण फी भरता आली नसल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कॉलेजचे डायरेक्टर अंकूश गोयल यांनी या सर्व १२० मुलांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण असून यामुळे महाराष्ट्रातील १२० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य जपले गेले आहे. आमदार नितेश राणे यांच्या मोलाच्या प्रयत्नामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Recent Posts

Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…

35 mins ago

Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…

1 hour ago

रायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…

2 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…

4 hours ago

आज मुंबईत पाणीकपात !

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…

6 hours ago

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…

7 hours ago