Bacteria : कोरोनाआधी देशात पाच प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे लाखो जणांचा मृत्यू

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे भारतासह जगभरात लाखो जणांचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी २०१९ मध्ये भारतात पाच प्रकारच्या जिवाणूंमुळे (Bacteria) सहा लाख ७८ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

एका नियतकालिकात याबाबतचा अहवाल प्रकाशित झाला आहे. ई. कोली, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बाउमनी हे पाच जीवाणू भारतीयांसाठी प्राणघातक ठरत आहेत. या जिवाणूंचा संसर्ग २०१९ मध्ये मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण होते.

संशोधकांनी ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१९’ व अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्समधील डेटाचा वापर केला. त्यात ३४ कोटी व्यक्तींची जिवाणू संसर्गाबद्दलची माहिती अभ्यासली. जगात ३३ जिवाणूंमुळे २०१९ मध्ये तब्बल ७७ लाख जणांनी प्राण गमावले. यापैकी पाच जिवाणूंमुळेच निम्मे मृत्यू झाले, असेही या अहवालात म्हटले आहे. या ३३ जीवाणूंसह ११ प्रमुख संसर्गांसह त्यांच्याशी संबंधित मृत्यूची प्रथमच माहिती देण्यात आली आहे.

भारतात ई. कोली, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बाउमनी हे पाच जीवाणू सर्वात प्राणघातक ठरत आहेत. २०१९ मध्ये या पाच जीवाणूंमुळे देशभरात सहा लाख ७८ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ई कोली सर्वाधिक प्राणघातक जीवाणू असून त्याच्या संसर्गामुळे १.५७ लाख जणांनी प्राण गमावले.

Diabetes : मोबाईल-लॅपटॉप देतो मधुमेहाला निमंत्रण

जगभरात २०१९ मध्ये एकूण मृत्यूमध्ये हृदयविकाराचा पहिला क्रमांक होता. त्यानंतर जीवाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दुसरा क्रमांक लागतो. जीवाणू संसर्गाचे मृत्यू कमी करण्यासाठी नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करणे, प्रतिजैवकांचा परिणामकारक वापर महत्त्वाचा असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. जीवाणू संसर्गाला जागतिक सार्वजनिक आरोग्यात महत्त्व देण्याची गरज व्यक्त करत निदान प्रयोगशाळांची संख्या वाढवून मजबूत आरोग्य यंत्रणा उभारण्याचे उपायही सुचविले आहेत.

Recent Posts

SAIL Recruitment : आनंदाची बातमी! युवकांना मिळणार भारतातील ‘या’ मोठ्या कंपनीत काम करण्याची संधी

लवकरच करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : सध्या अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. अशाच…

1 hour ago

Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका…

1 hour ago

Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार…

1 hour ago

बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना…

2 hours ago

Dombivali news : पती-पत्नीमधील वाद सोडवणार्‍यांनाच संपवलं; दोन वेगवेगळ्या हत्यांनी डोंबिवली हादरलं!

डोंबिवली : संसार म्हटला की वाद, मतभेद होतातच. पण हे वाद जर प्रचंड टोकाला गेले…

2 hours ago

Eknath Shinde : दिघेसाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला प्रश्न होता, ‘दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political…

3 hours ago