नाशिक (प्रतिनिधी ):कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील बाधितांचा आकडा वाढतच असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४,०६४ पर्यंत पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अवघे सात टक्के असून, ९३ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत २१५ रुग्ण महापालिका, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, यातील ६७ रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये कोमार्बिड रुग्णांसह लस न घेतलेल्या रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोनाने उसळी घेतली असून, दररोज बाधितांचा आकडा हा हजारापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नागरिक तसेच यंत्रणेत धडकी भरली असली तरी यातील बहुतांश बाधितांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समोर आले आहे. शहरातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा पर्यंत ४,०६४ पर्यंत पोहचला आहे. परंतु, यातील ९३ टक्के रुग्ण हे अलगीकरणात असून, ते घरी राहूनच उपचार घेत आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असून, या रुग्णांच्या प्रकृतीवर महापालिका लक्ष ठेवून आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. विशेष म्हणजे शहरातील करोनातून बरे होण्याची टक्केवारी ही ९७ टक्यांपर्यंत आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण हे सुरुवातीला ९० टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे शहरात सध्या तरी कोरोनाची तिसरी लाट ही सौम्य ठरल्याचे चित्र आहे.
शहरातील अॅक्टिव्ह ४,०६४ रुग्णांपैकी २१५ रुग्ण हे महापालिका तसेच इतर रुग्णालयात दाखल आहेत. यातील २१ रुग्ण हे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात, तर ६२ रुग्ण हे बिटको रुग्णालयात दाखल आहेत. त्यात ६७ रुग्ण ऑक्सिजनवर असून, १९ रुग्ण हे आयसीयूत अपचार घेत आहे. अकरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. विशेष म्हणजे दाखल रुग्णांमधील रुग्ण हे लस न घेतलेले तसेच कोमार्बिड रुग्ण आहेत. त्यामुळे लसवंतांना कोरोनाचा धोका सध्या कमी असून, लस न घेतलेल्यांसाठी तिसरी लाट तापदायक ठरत असल्याचे चित्र आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…