पत्रके वाटणारे मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा पाठपुरावा केला जात आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. हे पत्रक घरोघरी पोहोचवावे, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते. मुंबईच्या चेंबूर व चांदिवली परिसरात मनसैनिकांनी घरोघरी जाऊन हे पत्रक वाटायला सुरुवात केली होती. मनसैनिकांकडून चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या पत्रकाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी या मनसैनिकांना तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसैनिकांना नक्की का ताब्यात घेतले?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.

शुक्रवारी चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या वतीने पत्राची देव साक्षीने पूजा करून घरोघरी वितरण करण्याचा शुभारंभ योजण्यात आला होता. यावेळी घाटकोपर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. सकाळी साडेअकराच्या सुमारास चंदिवली विभागाचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली हे मंदिरात दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच त्यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत शाखाध्यक्ष राहुल चव्हाण या पदाधिकाऱ्याला यावेळी ताब्यात घेण्यात आले. उशिरापर्यंत हे पदाधिकारी घाटकोपर पोलीस ठाण्यातच होते. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले नाही, ते हे पत्र त्यांच्या स्थानिक भागात वाटणार असल्याची माहिती भानुशाली यांनी दिली.

पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायला गेल्यास त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता मनसे याविरोधात आक्रमक होणार का?, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की, ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्वीट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.

Recent Posts

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…

2 hours ago

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…

3 hours ago

मराठी पाट्या लावण्यासाठी सक्ती का करावी लागते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…

4 hours ago

कामगारांना सुरक्षित वातावरण हवे

आशय अभ्यंकर, प्रख्यात अभ्यासक देश जागतिक पातळीवर विकासाच्या नवनवीन पायऱ्या पार करत असताना कामगारांची उत्तम…

5 hours ago

‘मॉरिशस रूट’ टाळण्यासाठी…

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार भारतातून मॉरिशसला निधी पाठवायचा, तेथे कंपनी स्थापन करायची आणि मग तो पैसा…

5 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शुक्ल. चंद्रराशी मकर,…

6 hours ago