जनावरांना लंपी आजाराचा विळखा, पशुसंवर्धन विभाग सतर्क

Share

धुळे (वार्ताहर) : जळगाव, धुळे व नगर येथे जनावरांना होणारा लंपी या आजाराने विळखा घातला आहे. या जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या सोयगाव, सिल्लोड, कन्नड तालुक्यांना लंपी स्कीन डिसीजचा जास्त धोका असल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. फर्दापूर गावात आजार सदृश जनावरे आढळल्याने औरंगाबाद जिल्ह्यात पशुवैद्यकीय पथके तैनात करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून लंपी स्कीन आजाराचा नायनाट करण्यात आला होता. परंतु जळगाव नगर, धुळे या जिल्ह्यात या आजाराचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव, सिल्लोड या तालुक्यात संशयित जनावरे आढळून आली आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागातर्फे पथके तयार करण्यात आली असून संशयित जनावरे आढळलेल्या पाच किलोमीटर अंतरावर औषधाची फवारणी करण्यात आली आहे.

संशयित जनावरांचा अहवाल पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून चार दिवसात याचा अहवाल येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सतर्क राहून या आजाराचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन औरंगाबाद जि.प. पशुसंवर्धन विभागाच्यातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत लंपी स्कीन डिसीज आजाराचे जनावरे आढळले नसले तरी काही जनावरांना या आजाराची लक्षणे दिसून आली आहे. दरम्यान जिल्हात पशुवैद्यकीय पथके नेमून सोडियम हायपोक्लोराइट, जंत नाशकाची गोठ्यात फवारणी करण्यात आली आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा माने यांनी सांगितले.

अशी आहेत रोगाची लक्षणे

जनावरांच्या त्वचेवर गाठी, डोळे, मान, पाय, कासेच्या भागात १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज येणे, जनावरे लंगडणे, डोळ्यातून व नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज येणे तर जनावरांना आठवडाभर तापही येतो.

अशी घ्या काळजी

या आजारावर नियंत्रणासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. हवेशीर वातावरण ठेवावे, गोठा परिसरात पाणी, डबके, साठणार नाही याची काळजी घ्यावी, बाधित जनावरांना वेगळे करावे, बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये, जनावरांच्या संपर्कात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

3 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

6 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

7 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

7 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

9 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

9 hours ago