औरंगाबाद (हिं.स.) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील सुमारे १,७०० गावांना बसला असून, सुमारे ३ लाख ७८ हजार ७५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.
दरम्यान सव्वा लाख हेक्टरचे पंचनामे झाले असून अजूनही अडीच लाख हेक्टरचे पंचनामे बाकी आहेत. तर तब्बल ६ लाख २१ हजार ६९४ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५,३३,३८४ शेतकरी बाधित झाले आहेत. तर २ लाख ९८ हजार ८६१.१७ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून १,५७० गावे बाधित झाली आहेत. त्या खालोखाल हिंगोली ८५,६०० शेतकरी बाधित झाले आहेत, तर ७६ हजार ७७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ६२ गावे बाधित झाली आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर परभणी असून १,५०० शेतकरी बाधित, १ हजार २०० हेक्टर जमिनीचे नुकसान, तर ३ गावे बाधित झाली आहेत. चौथ्या क्रमांकावर लातूरमध्ये ७७५ शेतकरी बाधित, १ हजार ६४०.५७ हेक्टर जमिनीचे नुकसान, ८ गावे बाधित झाली आहेत.
त्यापाठोपाठ जालन्यात ३७७ शेतकरी बाधित, २५५.७४ हेक्टर जमिनीचे नुकसान, तर एक गाव बाधित झाले आहे. बीडमध्ये ५८ शेतकरी बाधित, २६.८० हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून एक गाव बाधित झाले आहे. या जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद आणि उस्मानाबादमधील नुकसान नगण्य असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…
निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…
जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…