लोणावळ्यात पर्यटनस्थळी पर्यटकांना पाचनंतर प्रवेश बंदी पोलिसांचा निर्णय

Share

लोणावळा (वार्ताहर) : लोणावळ्यात पर्यटनस्थळी पाच नंतर पर्यटकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी लोणावळा पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. विशेषत: वीकेंडमध्ये ही गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवताना दिसू लागला आहे. त्यामुळे ही गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सायंकाळी पाचनंतर येथे पर्यटकांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत लपलेले डोंगर धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हिरवागार परिसर, धबधबे, रिमझिम पाऊस याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटकांची हजेरी आणि खास पसंती ही विशेषत: लोणावळ्याला दिलेली दिसून येते आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांना हा आनंद घेता आलेला नाही. पर्यटकांच्या भेटीमुळे ही संख्या वीकेंडला तर लाखोंच्या घरात देखील जाताना दिसून येते. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते.

वाहतूक कोंडी आणि दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षा विहाराच्या निमित्ताने हजारो पर्यटक भुशी धरण, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट इथे दाखल होतात. नुकतेच मुंबईतील एका पर्यटकाचा भुशी धरणात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

Recent Posts

Reel बनवण्याच्या नादात तरूणाने १०० फूट उंचावरून पाण्यात मारली उडी, झाला मृत्यू

मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…

53 mins ago

मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…

2 hours ago

खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसण्याची सवय लावा, होतील हे बरेच फायदे

मुंबई: जमिनीवर ज्या पद्धतीने लोक बसतात ते एक प्रकारचे आसन असते. यामुळे शरीरास अनेक फायदे…

2 hours ago

पुण्यातील ” हिट अँड रन ” प्रकरणी कुणालाही सोडणार नाही

पुणे : पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे…

3 hours ago

Anant Ambani: ३०० व्हीआयपी पाहुण्यांसोबत क्रूझवर होणार अनंत अंबानीचे दुसरे प्री वेडिंग

मुंबई: बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन…

3 hours ago

आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; योगी आदित्यनाथांचे यांचा आरोप

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आम…

4 hours ago