मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये मणिपूरच्या दोन मतदारसंघांत मतदान होत आहे. या मतदानादरम्यान मणिपूरमधील मोइरांग विभागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाल्यामुळे मतदान करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराहट पसरली असून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर लोक पळत असल्याचे दिसत आहे. या गोळीबारात तीनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर येथे अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच मणिपूरच्या इम्फाळ पूर्व येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएमची तोडफोड झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालच्या कूच बिहारमधील एका मतदान केंद्रावर दगडफेक झाली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…
मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…
९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…