नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. आसाममध्ये निवडणुकीआधी प्रचारात गुंतलेले राजकीय पक्ष आपल्या विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींचे भविष्य अंधारात असून २०२६ पर्यंत काँग्रेस राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी विश्वनाथमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा अर्थ राहुल गांधींना मत देणे. भाजपला मत देण्याचा अर्थ नरेंद्र मोदींना मत देणे. जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करतात आणि मानतात भारत हा विश्वगुरू बनावा ते या निवडणुकीत भाजपला मतदान करतील. जे लोक राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात त्यांना माहीत आहे की त्यांचे भविष्य अंधारात आहे.
गेल्या दीड महिन्यात तुम्ही काँग्रेस पक्षाची घसरण पाहिली कारण अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले. माझ्या मते २०२६ पर्यंत आसाममध्ये कोणताही काँग्रेस पक्ष राहणार नाही.
लोकसभा निवडणुकीपर्यंत चांगले नेते भाजपात सामील होत राहतील आणि लोकसभा निवडणुकीनंतरही सामील होण्याची प्रक्रिया सुरू राहील.
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्या…
'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…